Posts

Showing posts from April, 2020

महाभारत...एक दीपस्तंभ

राग, लोभ, इर्षा, असूया, निती, अनिती, कपट, माया, आस्था, त्याग, प्रेम,मोह, काम, विकार, या आणि अश्या असंख्य भावभावनांचा कल्लोळ म्हणजे महाभारत. विचारांचे अनेक पैलू समोर येत असतानाच धर्म म्हणजे काय, अधर्म म्हणजे काय, चांगले काय, वाईट काय, असे अनेक प्रश्न पडत राहतात आणि त्यांची उकल पण होत राहते. अनादी काळापासून असलेले हे कालातीत चित्र  आहे, ज्यावर असंख्य रंग छटा उमटत आहेत..  विचारांचा ,भावनांचा गुंता , त्यातील घालमेल, मानस शास्त्र उकलत जाणारी ही विचारधारा अनंत अंगाने समोर प्रकट होते. विविध कंगोरे नजरेसमोरून जातात आणि येतात, कसोटीचे क्षण येतात. महात्मे म्हणून समोर येणारी व्यक्तिमत्वे काहीवेळा अगदी सर्व सामान्य माणसाच्या वैचारिक पातळीवर येऊन अगदी हीन कृती करताना आढळतात. उत्तुंग गिरी शिखरे पादाक्रांत करता करता अचानक स्वतःला खोल खोल गर्तेत झोकून टाकताना दिसतात.. मग प्रश्न पडतो, यातील खरा कोण.. निती ने वागणारा मगाचा असामान्य मानव का अनीतीच्या कचऱ्यात स्वतःला हरवणारा एक अतिसूक्ष्म जीव. माणूस म्हणून पाहिले की जाणवते..ही तर आपल्या सारखी हाडा मांसाची माणसे. दैव- कर्म याची सांगड घाल...